Tuesday, July 28, 2026
spot_img
Homeताज्या बातम्यानवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांच्या नावासाठी ८ जुलैला रस्ते चक्काजाम; रश्मीता ताईंच्या...

नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांच्या नावासाठी ८ जुलैला रस्ते चक्काजाम; रश्मीता ताईंच्या उपोषणाला आगरी सेनेचा पाठिंबा

नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आता भूमिपुत्र आरपारच्या लढ्याच्या तयारीत आहेत. याच मुख्य मागणीसाठी आणि भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कासाठी आमच्या धडाडीच्या भगिनी रश्मीता ताई या आमरण उपोषणाला बसल्या आहेत. प्रकृतीची पर्वा न करता, आपल्या समाजाच्या अस्मितेसाठी रश्मीता ताईंनी सुरू केलेल्या या आंदोलनाला आता संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड पाठिंबा मिळत आहे.

या संवेदनशील प्रसंगी आगरी सेना प्रमुख आदरणीय प्रदीपजी राजाराम साळवी साहेब यांनी उपोषणस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन रश्मीता ताईंच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. एवढंच नाही तर, विमानतळाला दिबांचं नाव लागेपर्यंत आगरी सेना शांत बसणार नाही, अशी भविष्यातील अत्यंत आक्रमक भूमिकाही साळवी साहेबांनी यावेळी स्पष्ट केली.

८ जुलैला रस्ते चक्काजाम होणारच! आंदोलकांनी सरकारला थेट इशारा दिला आहे की, ९४ गावांतील प्रकल्पबाधित, शेतकरी, कष्टकरी आणि आगरी-कोळी समाज ८ जुलैला मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे. ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील सर्व भूमिपुत्र एकत्र येणार असून विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. “सरकारने कितीही गुन्हे दाखल केले किंवा दडपशाही केली, तरी आम्ही थांबणार नाही. रस्ते चक्काजाम झाल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही,” अशी संतप्त आणि ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. ही लढाई अस्मितेची असून दिबांचे नाव विमानतळाला लागल्याशिवाय आता भूमिपुत्र माघार घेणार नाहीत, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

NCW चेअरपर्सन महिलांना आर्थिक वाढीसाठी AI वापरण्याचे आवाहन करतात | पुणे बातम्या

0
विश्वकर्मा विद्यापीठाने राष्ट्रीय महिला आयोगाने आयोजित केलेल्या यशोदा एआय 2.0 कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षा विजया रहाटकर, उपसंचालक रामावतार सिंग, जिल्हा ग्रामीण विकास...

पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

0
पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या (झेडपी) इमारतीत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेच्या पदाधिकाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने मोठे नाट्य...

एसपीपीयूच्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह आणि स्टायपेंडच्या प्रश्नांना झेंडा दाखवला, रोहित पवार यांनी कारवाईचे आश्वासन दिले...

0
एनसीपी (एसपी) नेते रोहित पवार एसपीपीयूच्या विद्यार्थ्यांसोबत पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (एसपीपीयू) विद्यार्थ्यांनी रविवारी कॅम्पस भेटीदरम्यान आमदार रोहित पवार यांच्याशी झालेल्या...

कन्फ्यूशियसचे दिवसाचे कोट, “जेव्हा तुम्ही एखाद्या योग्य व्यक्तीला पाहता, तेव्हा त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न...

0
कन्फ्यूशियसचे दिवसाचे कोट कन्फ्यूशियस हा इतिहासातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रभावी विचारवंतांपैकी एक आहे. त्याच्या शिकवणींनी चीन, कोरिया, जपान, व्हिएतनाम आणि आशियातील इतर अनेक...

‘माझे सलग तिसरे CWG सुवर्ण जिंकण्यासाठी नम्र आहे’: मीराबाई चानू ग्लासगोमध्ये भारताला पहिले सुवर्ण...

0
मीराबाई चानू (एएनआय फोटो) मीराबाई चानूने ग्लासगो 2026 येथे महिलांच्या 48 किलो वजनाच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत तिचे सलग तिसरे सुवर्णपदक जिंकून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत...

NCW चेअरपर्सन महिलांना आर्थिक वाढीसाठी AI वापरण्याचे आवाहन करतात | पुणे बातम्या

0
विश्वकर्मा विद्यापीठाने राष्ट्रीय महिला आयोगाने आयोजित केलेल्या यशोदा एआय 2.0 कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षा विजया रहाटकर, उपसंचालक रामावतार सिंग, जिल्हा ग्रामीण विकास...

पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

0
पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या (झेडपी) इमारतीत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेच्या पदाधिकाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने मोठे नाट्य...

एसपीपीयूच्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह आणि स्टायपेंडच्या प्रश्नांना झेंडा दाखवला, रोहित पवार यांनी कारवाईचे आश्वासन दिले...

0
एनसीपी (एसपी) नेते रोहित पवार एसपीपीयूच्या विद्यार्थ्यांसोबत पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (एसपीपीयू) विद्यार्थ्यांनी रविवारी कॅम्पस भेटीदरम्यान आमदार रोहित पवार यांच्याशी झालेल्या...

कन्फ्यूशियसचे दिवसाचे कोट, “जेव्हा तुम्ही एखाद्या योग्य व्यक्तीला पाहता, तेव्हा त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न...

0
कन्फ्यूशियसचे दिवसाचे कोट कन्फ्यूशियस हा इतिहासातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रभावी विचारवंतांपैकी एक आहे. त्याच्या शिकवणींनी चीन, कोरिया, जपान, व्हिएतनाम आणि आशियातील इतर अनेक...

‘माझे सलग तिसरे CWG सुवर्ण जिंकण्यासाठी नम्र आहे’: मीराबाई चानू ग्लासगोमध्ये भारताला पहिले सुवर्ण...

0
मीराबाई चानू (एएनआय फोटो) मीराबाई चानूने ग्लासगो 2026 येथे महिलांच्या 48 किलो वजनाच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत तिचे सलग तिसरे सुवर्णपदक जिंकून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत...
error: Content is protected !!